शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’ करणार ३३००ची मागणी-जयसिंगपूरला आज ऊस परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:17 IST

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यंदाची पहिली उचल टनास ३३०० रुपये असण्याची शक्यता आहे. आज, शनिवारी जयसिंगपूर येथे होणाºया ऊस परिषदेत पहिल्या उचलीचा बार फुटणार आहे.

ठळक मुद्दे या हंगामातील अंतिम दर हुतात्मा कारखान्याने ३३५० दिला.यंदा बाजारात साखरेचा दर ३५०० रुपये क्विंटल आहे.गुरुवारी समितीच्या अध्यक्षांना पत्र देऊन तातडीने बैठक घेण्याची मागणी

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यंदाची पहिली उचल टनास ३३०० रुपये असण्याची शक्यता आहे. आज, शनिवारी जयसिंगपूर येथे होणाºया ऊस परिषदेत पहिल्या उचलीचा बार फुटणार आहे. मागणी कितीही असली तरी खासदार राजू शेट्टी तडजोड कितीवर करतात आणि एफआरपीपेक्षा किती रक्कम जास्त द्यावी लागणार, ती एफआरपीसोबत की काही मुदतीनंतर द्यावी लागणार हाच कळीचा मुद्दा आहे. यंदाचा गळीत हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेच्या आधीही कारखानदारांसमवेत बैठक घेऊन चर्चा करायची तयारी दर्शवली होती; परंतु संघटना व कारखानदार यांना एकत्र आणण्यास कुणीच पुढाकार घेतला नाही. सरकार म्हणून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गतवर्षी ऊसदरात पुढाकार घेतला होता; परंतु यंदा शेट्टी भाजपावर देशभर फिरून टीकेचा भडिमार करीत असल्याने पालकमंत्र्यांनी या प्रश्नात अजून तरी लक्ष घातलेले नाही.

उलट पहिली उचल एफआरपीनुसार व अंतिम दर ७०:३० च्या फॉर्म्युल्यानुसार कारखाने देत असताना आंदोलनाची गरज नाही, असे सांगून टाकले आहे. त्यामुळे दोन्ही घटकांत चर्चाच होऊ शकलेली नाही. परिणामी, पहिल्या उचलीचा तिढा सुटल्यशिवाय स्वाभिमानी धुराडी पेटवू देणार नाही. त्यामुळे हंगाम सुरळीत व्हायला पहिला आठवडा जाणार आहे.गतवर्षी स्वाभिमानीने पहिली उचल ३२०० रुपये मागितली व एफआरपी आणि त्यासोबतच १७५ रुपये जादा देण्यावर तडजोड झाली. या हंगामातील अंतिम दर हुतात्मा कारखान्याने ३३५० दिला. याचा अर्थ स्वाभिमानीने मागणी केलेल्या उचलीपेक्षा हुतात्माने टनांस १५० रुपये जास्त दिले आहेत. यंदा बाजारात साखरेचा दर ३५०० रुपये क्विंटल आहे. गतवर्षीच्या तुलनेत दर चांगला असल्याने पहिली उचल वाढवून मागण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे. रघुनाथदादा पाटील यांच्या संघटनेने टनास ३५०० रुपयांची मागणी केली आहे. त्यांची मागणी प्रतिवर्षीच सर्वांत जास्त असते.

मागच्या हंगामातील अंतिम दर अजून निश्चित झालेले नाहीत. काही कारखान्यांनी साखरेचा दर कमी दाखविल्याने ऊसदर नियंत्रण समितीच्या २० सप्टेंबरला झालेल्या बैठकीत संघटनेच्या नेत्यांनी त्यास आक्षेप घेतला होता. त्यावर साखर आयुक्त कार्यालयानेच साखर दराबाबत खात्री करावी, असे ठरल्याने त्या बैठकीत कारखान्यांच्या अंतिम दराचे प्रस्ताव मंजुरीसाठी आले नव्हते. ही बैठक हंगाम संपण्यापूर्वी घ्यावी असे ठरले होते; परंतु ती अजून झाली नसल्याने खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी समितीच्या अध्यक्षांना पत्र देऊन तातडीने बैठक घेण्याची मागणी केली.दृष्टिक्षेपात हंगामसन २०१७-१८ या गाळप हंगामात अंदाजे नऊ लाख हेक्टर उसाची लागवड असून, ७२२ लाख टन ऊस उत्पादन अपेक्षित आहे, तर ७३.४ लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. सन २०१६-१७ च्या गाळपाच्या तुलनेत सन २०१७-१८ मध्ये ९४ टक्के वाढ अपेक्षित आहे. या हंगामात राज्यात १७० कारखाने सुरू होणार असल्याची माहिती मंत्री समितीने दिली आहे. यंदा परतीचा पाऊस सगळीकडे आॅक्टोबर अखेरपर्यंत झाल्यामुळे ऊस पिकास तो पोषक ठरला आहे. त्यामुळेही उत्पादन वाढणार आहे.साखरेचे संभाव्य मूल्यांकन असे :बाजारातील साखरेचा क्विंटलचा दर रु. ३५००त्याच्या ८५ टक्के रक्कम राज्य बँकेकडून उपलब्ध : २९७५त्यातून एफआरपीसह विविध कर्जांच्या व्याजापोटी ५०० रुपये कपातकारखान्यांना अनुषंगिक कामासाठी टनास २५० रुपये देणारनिव्वळ उसासाठी उपलब्ध : २२२५ रुपयेकोल्हापूर जिल्ह्णातील सरासरी एफआरपी : २८०० रुपयेज्या कारखान्यांचे कर्ज कमी आहे त्यांच्या व्याजापोटी ३०० रुपये गेल्यास ऊस बिलासाठी २०० रुपये जादा उपलब्धही रक्कम दहा उताºयाची आहे. हंगाम पुढे जाईल तसा उतारा वाढेल तेव्हा ही रक्कम वाढू शकते.