शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

‘स्वाभिमानी’ करणार ३३००ची मागणी-जयसिंगपूरला आज ऊस परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:17 IST

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यंदाची पहिली उचल टनास ३३०० रुपये असण्याची शक्यता आहे. आज, शनिवारी जयसिंगपूर येथे होणाºया ऊस परिषदेत पहिल्या उचलीचा बार फुटणार आहे.

ठळक मुद्दे या हंगामातील अंतिम दर हुतात्मा कारखान्याने ३३५० दिला.यंदा बाजारात साखरेचा दर ३५०० रुपये क्विंटल आहे.गुरुवारी समितीच्या अध्यक्षांना पत्र देऊन तातडीने बैठक घेण्याची मागणी

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यंदाची पहिली उचल टनास ३३०० रुपये असण्याची शक्यता आहे. आज, शनिवारी जयसिंगपूर येथे होणाºया ऊस परिषदेत पहिल्या उचलीचा बार फुटणार आहे. मागणी कितीही असली तरी खासदार राजू शेट्टी तडजोड कितीवर करतात आणि एफआरपीपेक्षा किती रक्कम जास्त द्यावी लागणार, ती एफआरपीसोबत की काही मुदतीनंतर द्यावी लागणार हाच कळीचा मुद्दा आहे. यंदाचा गळीत हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेच्या आधीही कारखानदारांसमवेत बैठक घेऊन चर्चा करायची तयारी दर्शवली होती; परंतु संघटना व कारखानदार यांना एकत्र आणण्यास कुणीच पुढाकार घेतला नाही. सरकार म्हणून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गतवर्षी ऊसदरात पुढाकार घेतला होता; परंतु यंदा शेट्टी भाजपावर देशभर फिरून टीकेचा भडिमार करीत असल्याने पालकमंत्र्यांनी या प्रश्नात अजून तरी लक्ष घातलेले नाही.

उलट पहिली उचल एफआरपीनुसार व अंतिम दर ७०:३० च्या फॉर्म्युल्यानुसार कारखाने देत असताना आंदोलनाची गरज नाही, असे सांगून टाकले आहे. त्यामुळे दोन्ही घटकांत चर्चाच होऊ शकलेली नाही. परिणामी, पहिल्या उचलीचा तिढा सुटल्यशिवाय स्वाभिमानी धुराडी पेटवू देणार नाही. त्यामुळे हंगाम सुरळीत व्हायला पहिला आठवडा जाणार आहे.गतवर्षी स्वाभिमानीने पहिली उचल ३२०० रुपये मागितली व एफआरपी आणि त्यासोबतच १७५ रुपये जादा देण्यावर तडजोड झाली. या हंगामातील अंतिम दर हुतात्मा कारखान्याने ३३५० दिला. याचा अर्थ स्वाभिमानीने मागणी केलेल्या उचलीपेक्षा हुतात्माने टनांस १५० रुपये जास्त दिले आहेत. यंदा बाजारात साखरेचा दर ३५०० रुपये क्विंटल आहे. गतवर्षीच्या तुलनेत दर चांगला असल्याने पहिली उचल वाढवून मागण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे. रघुनाथदादा पाटील यांच्या संघटनेने टनास ३५०० रुपयांची मागणी केली आहे. त्यांची मागणी प्रतिवर्षीच सर्वांत जास्त असते.

मागच्या हंगामातील अंतिम दर अजून निश्चित झालेले नाहीत. काही कारखान्यांनी साखरेचा दर कमी दाखविल्याने ऊसदर नियंत्रण समितीच्या २० सप्टेंबरला झालेल्या बैठकीत संघटनेच्या नेत्यांनी त्यास आक्षेप घेतला होता. त्यावर साखर आयुक्त कार्यालयानेच साखर दराबाबत खात्री करावी, असे ठरल्याने त्या बैठकीत कारखान्यांच्या अंतिम दराचे प्रस्ताव मंजुरीसाठी आले नव्हते. ही बैठक हंगाम संपण्यापूर्वी घ्यावी असे ठरले होते; परंतु ती अजून झाली नसल्याने खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी समितीच्या अध्यक्षांना पत्र देऊन तातडीने बैठक घेण्याची मागणी केली.दृष्टिक्षेपात हंगामसन २०१७-१८ या गाळप हंगामात अंदाजे नऊ लाख हेक्टर उसाची लागवड असून, ७२२ लाख टन ऊस उत्पादन अपेक्षित आहे, तर ७३.४ लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. सन २०१६-१७ च्या गाळपाच्या तुलनेत सन २०१७-१८ मध्ये ९४ टक्के वाढ अपेक्षित आहे. या हंगामात राज्यात १७० कारखाने सुरू होणार असल्याची माहिती मंत्री समितीने दिली आहे. यंदा परतीचा पाऊस सगळीकडे आॅक्टोबर अखेरपर्यंत झाल्यामुळे ऊस पिकास तो पोषक ठरला आहे. त्यामुळेही उत्पादन वाढणार आहे.साखरेचे संभाव्य मूल्यांकन असे :बाजारातील साखरेचा क्विंटलचा दर रु. ३५००त्याच्या ८५ टक्के रक्कम राज्य बँकेकडून उपलब्ध : २९७५त्यातून एफआरपीसह विविध कर्जांच्या व्याजापोटी ५०० रुपये कपातकारखान्यांना अनुषंगिक कामासाठी टनास २५० रुपये देणारनिव्वळ उसासाठी उपलब्ध : २२२५ रुपयेकोल्हापूर जिल्ह्णातील सरासरी एफआरपी : २८०० रुपयेज्या कारखान्यांचे कर्ज कमी आहे त्यांच्या व्याजापोटी ३०० रुपये गेल्यास ऊस बिलासाठी २०० रुपये जादा उपलब्धही रक्कम दहा उताºयाची आहे. हंगाम पुढे जाईल तसा उतारा वाढेल तेव्हा ही रक्कम वाढू शकते.